राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी

महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बन जनसेवेत रुजु

बुलढाणा जिल्हयातील महिला बचत गटाचा अभिनव उपक्रम सर्व बचत गटांना ठरणार प्रेरणादायी

बुलढाणा (प्रतिनिधी )
एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ..हा सहकारातील मूलमंत्र जोपासून सहकार्याच्या माध्यमातून लोकहिताची कामे केल्या जातात. सहकार हा महाराष्ट्राच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे असे मत केंद्रीय आयुष ( स्वतंत्र प्रभार ) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले….

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

 

महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजलक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन नुकतेच केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर, श्री सैभागे सर, पटवारी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघाचे अध्यक्ष विजय टेकाळे व्यासपीठावर उपस्थित होते …

 

ही बातमी वाचा –डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंतीचा समारोप मेळावा शेगांवात

ते पुढे म्हणाले की सहकाराची वाटचाल ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे झालीत त्यामुळेच केंद्र सरकारमध्ये सुद्धा नव्यानेच सहकार मंत्रालय सुरू करण्यात आल आहे. महिलांना सहकारातून स्वावलंबी बनवण्याचे काम राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पदसंस्थेच्या कोषाध्यक्ष सौ. मनीषा राऊत यांनी प्रास्ताविकातून पतसंस्थेच्या उद्देश आणि ध्येय धोरणासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली .. अध्यक्षीय भाषणात आमदार संजय गायकवाड म्हणले, की आमच्या लाडक्या बहिनी घर संभाळुन महिला बचत गटाच्या माध्यमातुन काम करत आहे. माझ्या बुलडाणा विधान सभा मतदार संघातील महीला बचत गट ठेव संचयनाच्या माध्यमातून पतसंस्थेमध्ये रूपांतरित होतो, हे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्यांम चांडक यांनी मार्गदर्शन करताना पतसंस्थेने घ्यावयाची काळजी आणि करावयाची अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव शिंदे यांनी महिलांचे सामाजिक योगदान अधोरेखीत केले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महिलांच्या कर्तत्वाला सलाम करत राजलक्ष्मी अर्बन महीला पतसंस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. तर श्री. सौभागे यांनी राजलक्ष्मी अर्बन पतसंस्थेतील संचालकांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती उपस्थितीना दिली. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top